वाचन -
शब्दओळख झाली की म्हणजेच शब्दाचे उच्चार करता आले की वाचन चांगल्या प्रकारे करता येते. तेवढेच नाही तर ज्या भाषेचे साहित्य वाचन करतो. त्या भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. मुख्य म्हणजे व्याकरण हे परिपक्व असणे देखील महत्वाचे असते. तेव्हाच नीट उच्चारण होते. व वाचन देखील चांगल्या प्रकारे होते.
शब्द -
प्रत्येक भाषेला लिपी असते. आपल्या मराठी भाषेची देवनागरी लिपी आहे. ही लिपी आपल्या मराठी भाषेबरोबर अनेक भाषेची आहे. जसे की हिंदी, संस्कृत व मराठी ह्यांसारख्या अनेक भाषेची लिपी ही देवनागरी आहे. लिपीनुसार शब्द असतात. व शब्दानुसार उच्चार असतो. अशी शृंखला असते. एक प्रकारची साखळी असते. अश्या प्रकारे शब्द असतात. अनेक शब्द मिळून एक लेख होतो. एक साहित्य देखील लिहिले जाते.
वाचन व शब्दवृध्दी -
आपण एखादे साहित्य वाचन करतो. म्हणजेच एखादे पुस्तक वाचन करतो. ते पुस्तक एखाद्या लेखकाने लिहलेले असेल किंवा मग माहिती देणारे एखादे शैक्षणिक संदर्भ पुस्तक असेल. ते पुस्तक आपण वाचन करतो. त्यामधून अनेक नवनवीन माहित मिळते. नवनवीन शब्द वाचन करायला मिळतात. आपण असे अनेक साहित्य वाचन केले असता आपल्याला एक नवीन बदल आपल्या बोलण्यात संवादात जाणवतो. तो म्हणजे आपण इतरांपेक्षा थोडे वेगळे शब्द वाचन करतो. म्हणजे नेमकं काय होतं ? तर आपल्या बोलण्यातील भाषेत बदल होतो. शब्द साठा वाढतो. शब्द मर्यादा वाढते. हा बदल फक्त वाचन केल्याने होते. हे मात्र निश्चित आहे. कारण हा माझा स्वतः चा अनुभव आहे.
No comments:
Post a Comment