समीक्षण आशय -
प्रस्तुत पुस्तक हे संत तुकाराम महाराज व संत रामदास महाराज ह्यांच्या अभंगाचे विश्लेषण करणारे एक पुस्तक आहे. ह्यामध्ये एखादा अभंग काय म्हणतो हे उदाहरण स्वरूप सांगण्यात आला. म्हणजेच अभंगाचे विश्लेषण हे उदाहरण स्वरूप केले त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजले आकलन झाले. पुस्तक जेव्हा हातात घेतले तेव्हा सर्वात आकर्षक होते. ते पुस्तकाचे समोरील पृष्ठभाग वरील चित्र त्याच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन अभंग व त्याची लिपी होती. त्यामुळे ते समोरील पृष्ठभाग अधिक चांगल्या पद्धतीने पुस्तकाची ओळख सांगत होते.
पुस्तकाच्या आतील रचना ही खूप चांगल्या पद्धतीने मांडली. पहिले संत तुकाराम महाराज ह्यांचे अभंग व नंतर संत रामदास महाराज ह्यांचे अभंग अशी अंतर्गत स्वरूप पुस्तकाचे आहे. हे पुस्तक लोकसत्ता ह्या वृत्तपत्र संस्थेचे आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या पुस्तकाची रचना केली व अंतर्गत रचना म्हणजे काही मुख्य अभंग मांडणी केली. त्याबद्दल लोकसत्ता वृत्तपत्र संस्थेचे आभार मानतो.
तुका राम दास हे पुस्तक सर्वांनी वाचन करावे. आजच्या काळात ज्यास्त कोणी कीर्तन व भजन कडे लक्ष देत नाही. किंवा काहींना वेळ मिळत नसेल तर त्यांच्या करिता हे पुस्तक एक ज्ञान संजीवन आहे. हे पुस्तक दोन थोर संताचे अभंग त्यांनी दिलेला संदेश सांगणारे हे पुस्तक आहे. तेव्हा नक्की वाचन करा. कृपया एक छोटी टिप्पणी (comment ) नक्की करा की ही समीक्षा तुम्हाला कशी वाटली.
.
Khup mast
ReplyDeleteThanks ☺️🙏
Delete